राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहीत्यिक व समाजसेवक यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. दिनांक 29 जुलै 1997 पासून ही योजना कार्यान्वीत करण्यात आलेली आहे.
25 व्यक्ती व 6 संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यांत येतो. पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. 25,000 व प्रती संस्था रू. 50,000 एवढी निश्चित केलेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस मार्फत एस टी बस प्रवास सवलत एक वर्षासाठी.
https://mahadbt.maharashtra.gov.in
या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
१) संबंधित जिल्ह्यांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय
२) संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य